१) ध्यान
हजारो वर्षापसून ध्यानाचा
सराव केला जातो. ध्यान आपल्या मन, मेंदू आणि
न्युरोंस वर काम करते. ध्यानाचे अनेक फायदे हे संशोधनात दिसून आले आहे, ध्यानामुळे आत्मविश्वास
वाढतो, एकाग्रता वाढते, मनशांती ची अवस्था गाठता.
ध्यान उच्च रक्त दाब, मानसिक समस्या
जसे कि डिप्रेशन, एंझायटी व इतर
समस्यांवर प्रभावी काम करते. तणावामुळे जे पोटाचे विकार निर्माण झालेले असतात ते
दूर होवून जातात.
ध्यानामुळे अध्यात्मिक
अनुभूती मिळते, अध्यात्मिक शांती मिळते.
२) संमोहन शास्त्र
संमोहन शास्त्राचा वापर
हजारो वर्षापसून होत आहे, शेकडो
वर्षांपासून वाज्ञानिक दृष्टीकोनातून देखील वापर होते आहे, जेव्हा भूल देण्याच्या
औषधाचा शोध लागला नव्हता तेव्हा तिथे संमोहन शास्त्राचा वापर करून बघितले होते व
त्याचा सकारात्मक रिझल्ट आला.
संमोहन शास्त्रामध्ये
अंतर्मनाच्या खोलवर जावून उपचार केले जातात. मानसिक समस्या जसे कि ताण, तणाव, नैराश्य, डिप्रेशन आणि एंझायटी वर
प्रभि उपाय होतो, मन शांत होते, एकाग्रता वाढते, आनंदी भावना वाढीस मदत
होते व ध्येय सुस्पष्ट होवून जाते, दुखण्यावर पराभवी
उपाय होतो, एडीएचडी वर प्रभावी उपाय
होतो, औषधांच्या साईड इफेक्ट वर
प्रभावी उपाय होतो, पोटांच्या
समस्यांवर प्रभावी उपाय होतो.
३) आकर्षणाचा सिद्धांत
आकर्षणाचा सिद्धांत जे
हजारो वर्षांपासून रहस्य दडलेले आहे त्याला सुलभ करतो. आकर्षणाचा सिद्धांताचा
मुख्य गाभा हा अंतर्मन, मन
मेंदू आणि विचारांवर आहे. सकारात्मक विचार, भावना निर्माण करून सकारात्मक मानसिकता
घडवतो. आरोग्यदायी आयुष्य जगण्याची जीवनशैली निर्माण होते. मानसिक आरोग्य सुधारते.
प्रोस्ताहित होवून आयुष्य जगता. नातेसंबंध सुधारतात. आत्म जागृती निर्माण होते,
आत्मविकास होतो.
४) रेकी हिलिंग
रेकी हिलिंग हि उर्जा
पद्धती आहे ज्यामध्ये उर्जेच्या स्तरावर नेवून उपचार व उपाय केले जातात. रेकी
हिलिंग चे उपचार प्रचंड शक्तिशाली असतात, तत्काळ तणाव नैराश्य आणि डिप्रेशन वर
प्रभावी काम करते. सकारात्मक उर्जा वाढते, शारीरिक आणि मनो शारीरिक आजारांवर
तत्काळ प्रभाव पडतो. रेकी हिलिंग उच्च दर्जाचे आयुष्य देते. रोग प्रतिकारक शक्ती
वाढते, औरा सक्षम होतो, कुंडलिनी सप्तचक्रे जागृत होवून योग्य प्रवाहित होतात.
ऑपरेशन नंतर रिकव्हरी मध्ये मदत होते.
५) अध्यात्म
अध्यात्म हजारो
वर्षांपासून लोकांना जगण्यासाठी बळ देते. अध्यात्मामुळे मानसिक आरोग्य सुधारते,
ताण तणाव कमी होतो, डिप्रेशन वर प्रभावी काम करते, अंतर्मन आणि शरीराचे कनेक्शन
सुरळीत होवून जाते. भावनांवर ताबा मिळवला जातो, अनैतिक कामापासून दूर ठेवले जाते.
जीवनात एक अर्थ मिळतो,
मान्य करण्याची क्षमता वाढीस लागते, नकारात्मक भावना कमी होतात, दैवी उर्जा
प्रवाहित होताना जाणवते, मानसिक, मनो शारीरिक आणि शारीरिक हिलिंग सुरु होवून जाते.
कुंडलिनी जागृत होवून
जाते. अध्यात्माचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगले परिणाम दिसून आले.
६) वास्तू उर्जा शास्त्र
वास्तू चे स्वतःचे एक
विश्व असते जे शक्तिशाली असते. वास्तू आपल्यावर परिणाम करता व आपण देखील वास्तू वर
प्रभाव पाडतो. दोघांचा परिणाम हा सर्वांगीण आयुष्यावर होतो, कुटुंबावर होतो,
मुलांवर, नातेसंबंधावर, आर्थिक आयुष्यावर आणि सर्व आयुष्याच्या भागांवर होतो. वास्तू चा प्रभाव हा प्रचंड शक्तिशाली
असतो, एका क्षणात होत्याचे नव्हते करू शकतो, हळू हळू नकारात्मक परिणाम पसरत असतील
तर ते मोठे झाल्यावरच समजून येते, जर मध्ये तज्ञांची मदत घेत तपासणी सुरु ठेवली तर
हे न दिसून येणारे वास्तू दोष देखील दूर केले जातात.
७) रत्न क्रिस्टल
क्रिस्टल पृथ्वी च्या
गर्भात सापडतात व त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ति असते जे तुमच्या सर्व प्रकारच्या
समस्या दूर करू शकतात. क्रिस्टल कुंडलिनी ऊर्जा चक्रे ह्यावर काम करतात, क्रिस्टल
कंपने आणि ऊर्जा ऊर्जा शास्त्राचा वापर करून वापरू शकता, वास्तु ऊर्जा
शास्त्रामध्ये क्रिस्टलला महत्व आहे. तुम्ही तुमच्या शारीरिक, मानसिक समस्या दूर
करू शकता, खाजगी, व्यवसाईक आणि सामाजिक समस्या दूर करू शकता.
रत्न किंवा रत्न ज्योतिष
ह्या आध्यात्मिक रत्नांमध्ये प्रचंड शक्ति आहे, तुमची कुंडलिनी बघून किंवा
रत्नांची शक्ति बघून उपाय व उपचार केले जातात.
रत्न, रत्न ज्योतिष किंवा
क्रिस्टल शास्त्रात पारंगत व्यक्ति रत्नांची शक्ति योग्य वापरू शकते नाहीतर
क्रिस्टल किंवा रत्ने उलटू शकतात, काहींना रत्न किंवा क्रिस्टल चा अयोग्य वापर
करता येतो त्यामुळे इथे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
८) डार्क एनर्जी
डार्क एनर्जी चे दोन
प्रकार आहेत, डार्क एनर्जी जी उत्पत्ति चे कारण आहे आणि प्रचंड शक्तिशाली आहे. ७० % पेक्षा जास्त मोठे युनिव्हर्स
हे डार्क एनर्जी ने व्यापलेले आहे. जसे
ब्लॅक होल प्रचंड शक्तिशाली असते आणि सर्व काही आपल्यात शोषून घेते तसे.
इथे दूसरा प्रकार म्हणजे
नकारात्मक ऊर्जा. तंत्र मंत्र शक्तींचा वापर करून प्रचंड शक्तिशाली नकारात्मक
ऊर्जा तयार केली जाते आणि तात्काळ रिझल्ट आणला जातो.
तुमच्या सर्वांगीण
आयुष्यावर तात्काळ परिणाम करणारी ही प्रचंड शक्तिशाली नकारात्मक ऊर्जा आहे.
वैकल्पिक उपचार पद्धती ही
आधुनिक वैज्ञानिक उपचार पद्धतीला पर्याय नाही तर आधुनिक उपचार पद्धती सोबत चालणारी
उपचार पद्धती आहे. इथे ज्या समस्या वैकल्पिक उपचार पद्धती मध्ये दिलेल्या मार्गानी
निर्माण झाल्या असतील त्या समस्या आरामात वैकल्पिक उपचार पद्धती मुळे पूर्णपणे ठीक
होऊन जातात.
काही जन वैकल्पिक उपचार
पद्धतीला श्रेष्ठ ठरवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीला नावे ठेवतात हे साफ चुकीचे
आहे. प्रत्येक शास्त्र हे मनुष्य प्राण्याच्या भल्यासाठी बनलेले आहे. चांगले वाईट
लोक हे सर्व शास्त्रामध्ये असतात.
जसे वैकल्पिक उपचार
पद्धती करणारे डॉक्टर रेफर करतात तसेच डॉक्टर देखील वैकल्पिक उपचार पद्धती रेफर
करतात पण कोणी कुणाला रिप्लेस करत नाही.
वैकल्पिक उपचार पद्धती हि
ऊर्जा शास्त्र, रेकी हिलिंग, कुंडलिनी, ज्योतिष, रत्न
क्रिस्टल, अध्यात्म, अंतर्मनाचे शास्त्र, अध्यात्म आणि तंत्र मंत्र शास्त्र ह्यावर
अवलंबून आहे. वैकल्पिक उपचार पद्धतीचा गाभा हा भौतिक नसून उर्जेच्या स्तरावरचा आहे
त्यामुळे वैकल्पिक उपचार पद्धती हि कधी कधी तत्काळ काम करते.
तुमच्या खाजगी समस्या असो, व्यवसायिक, आर्थिक,
अध्यात्मिक, नकारात्मक ऊर्जा किंवा
शारीरिक, मनो शारीरिक व शारीरिक समस्या असो ह्या सर्वांवर वैकल्पिक उपचार पद्धती
प्रभावी काम करते.
इतर शास्त्राप्रमाणे हे
शास्त्र देखील वापर करण्याच्या नैतिकतेवर अवलंबून आहे, अत्यंत प्रभाव शाली असलेले वैकल्पिक उपचार
पद्धती शास्त्र हे तत्काळ नकारात्मक काम करते त्यामुळे शिष्य निवडतांना देखील
काळजीपूर्वक निवडले जातात.
इतर शास्त्राप्रमाणे हि
सर्व शास्त्रे उपचार करणाऱ्यांवर उलटण्याची शक्यता असते त्यामुळे देखील ह्या
क्षेत्रात उतरण्याअगोदर १० वेळा विचार करा.
वैकल्पिक उपचार पद्धती
उपाय, उपचार व कन्सल्ट अश्याच थेरपिस्ट कडून करून घ्यायचे ज्यांनी कमी कमी ३ वर्षे
पूर्ण कालावधी साठी अभ्यास केला असेल नाहीतर दोघांना साईड इफेक्ट होतो.
साधे तज्ञांकडून ध्यान न
शिकल्यामुळे, ध्यान व मानसोपचार तज्ञ
ह्यांच्या थेरपी मध्ये ताळमेळ न बसवल्यामुळे अनेकांना ध्यानाचा नकारात्मक परिणाम
जाणवला आहे, त्यामुळे कृपया त्या
क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या तज्ञ किंवा गुरुन कडूनच उपचार किंवा
कोर्स करून घ्यावा.
फी अनुभवानुसार वाढत जाते, जर समस्या मोठी आणि १ वर्षांपुढील असेल तर
फक्त अनेक वर्षांचा अनुभव असलेले गुरु तुम्हाला ह्या मधून बाहेर काढू शकतात जर १
वर्षांपेक्षा कमी असेल तर फ्रेशर देखील चालतात.
इथे समस्येची तीव्रता
देखील बघितली जाते, जर जास्त तीव्रता असेल तर अनेक वर्षांचा अनुभव असलेले गुरु आणि
कमी असेल तर फ्रेशर किंवा कोणीही चालेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
थेरपिस्ट, हीलर, संमोहन तज्ञ आणि
अध्यात्मिक गुरु
*ऑनलाईन कन्सल्ट ची वेळ
निश्चित करण्यासाठी ८०८०२१८७९७ ह्या क्रमांकावर संपर्क कराल. शुल्क लागू.
Comments
Post a Comment